पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी पोचिशे बोईशाख च्या निमित्ताने गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांना आदरांजली अर्पण केली
Posted On:
09 MAY 2026 9:10AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘पोचिशे बोईशाख’ च्या विशेष प्रसंगी गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांना आदरांजली अर्पण केली.
गुरुदेव टागोर अतिशय अद्भुत प्रतिभेचे कवी, लेखक व विचारवंत तर होतेच शिवाय विलक्षण तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ञ, कलाकार व जगभरात भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जात होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
गुरुदेव टागोर यांनी मानवतेच्या गहन भावनेला व भारतीय संस्कृतीच्या उदात्त आदर्शांना आपल्या साहित्यातून उजागर केले होते असे पंतप्रधानांनी नमूद केले. गुरुदेवांनी समाजात नवीन विचार, प्रतिभेची ऊर्जा व सांस्कृतिक स्वाभिमान विकसित केल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
आज देशभरात गुरुदेव टागोरांच्या प्रति अतीव आदर व कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जात असल्याचे मोदी यांनी म्हटले. यापुढेही गुरुदेवांच्या विचारांमुळे जनतेला त्यांच्या सर्व कार्यांमध्ये प्रेरणा व मार्गदर्शन मिळत राहील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पंतप्रधानांनी एक्स वरील आपल्या संदेशात म्हटले आहे,
“आज पोचिशे बोइशाख च्या विशेष निमित्ताने आम्ही सर्वजण गुरुदेव टागोर यांना आदरपूर्वक हार्दिक अभिवादन करत आहोत.
गुरुदेव टागोर अतिशय अद्भुत प्रतिभेचे कवी, लेखक व विचारवंत तर होतेच शिवाय विलक्षण तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ञ, कलाकार व जगभरात भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जात होते. गुरुदेव टागोर यांनी मानवतेच्या गहन भावनेला व भारतीय संस्कृतीच्या उदात्त आदर्शांना आपल्या साहित्यातून उजागर केले होते. गुरुदेवांनी समाजात नवीन विचार, प्रतिभेची ऊर्जा व सांस्कृतिक स्वाभिमान विकसित केला होता.
आज देशभरात गुरुदेव टागोरांच्या प्रति अतीव आदर व कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जात आहे. यापुढेही गुरुदेवांच्या विचारांमुळे जनतेला त्यांच्या सर्व कार्यांमध्ये प्रेरणा व मार्गदर्शन मिळत राहील याची मला खात्री आहे.”
***
आशिष सांगळे/उमा रायकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2259286)
अभ्यागत कक्ष : 9